पुस्तके – थोडक्यात परिचय

पुस्तके - थोडक्यात परिचय

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ‘माझी आत्मकथा’

‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अमेरिका आणि सोविएत संघामधील अंतराळ स्पर्धा

ही कहाणी आहे दोन देशांमध्ये झालेल्या अंतराळ स्पर्धेची. सर्व प्रथम अंतराळात कोण आपले रॉकेट पाठवेल, कोण सर्वप्रथम अंतराळात माणूस पाठवेल इथून चालू असलेली ही स्पर्धा कोण सर्व प्रथम चंद्रावर माणूस उतरवेल इथपर्यंत येऊन पोचली. २० जुलै १९६९ रोजी अपोलो ११ मधून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरल्यावर ही स्पर्धा अमेरिकेने जिंकली असली तरी सोव्हिएत रशियानेही या स्पर्धेत Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

छत्रपती शिवाजी महाराज – रायरी – गोष्ट शिवभक्तांची

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतानी अत्याचाराने पिचलेल्या रयतेमध्ये चेतना निर्माण करत रयतेचे स्वराज्य स्थापन केले. पूर्ण भारतात मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला. त्यांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवले, स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्यांची कृती, त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज आजच्या पिढीला पूर्णपणे समजले आहेत का? शिवजयंतीला धांगडधिंगा करत नाचत मिरवणुका काढणे यातच आजची तरुण पिढी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

‘अन्न’ – अन्नाभोवती फिरणारा माणसाचा संक्षिप्त इतिहास

‘आज जेवण काय बनवायचं?’ हा जवळपास प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा प्रश्न. आज विविध पदार्थ बनवण्याची कृती आणि त्याची साधने यांची विपुल उपलब्धता असतानाही आजच्या जमान्यात रोज वरील प्रश्न पडत असेल तर मानवाच्या अगदी सुरुवातीच्या काळात काय परिस्थिती असेल? जिथे सुरुवातीला भटके जीवन जगत शिकार करत आपले पोट भरणाऱ्या माणसाला विश्वातील बहुतांश गोष्टी अज्ञात असताना ‘जेवण’ Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

दुर्ग – गडकिल्ल्यांची माहिती सांगणारे पुस्तक

गडकोट हेच राज्य… गडकोट म्हणजे या राज्याचे मूळ… गडकोट म्हणजे खजिना… गडकोट म्हणजे सैन्याचे बल… गडकोट म्हणजे राजलक्ष्मी… गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थाने… गडकोट म्हणजे सुखनिद्रागार… किंबहुना…… गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक… अगदी प्राचीन काळापासून कोणत्याही राज्यामध्ये गडकिल्ले अत्यंत महत्त्वाचे स्थान राखून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा याच गडकिल्यांच्या मदतीने बलाढ्य अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याच Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

अजमल कसाब ला फाशी देण्याची मोहीम -‘ऑपरेशन X’

२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबई सह पूर्ण भारत देश हादरला. दहशतीचे हे थैमान सलग चार दिवस सुरू होते. हा हल्ला करणाऱ्या १० पैकी ९ दहशतवादी मारले गेले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी अजमल अमीर कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले पण यामध्ये त्यांना Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

Eagles over Bangladesh – भारतीय हवाई दलाचा १९७१ च्या युद्धातील पराक्रम

१६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका मध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख एअर मार्शल एच सी दिवाण यांनी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए ए के नियाजी (ज्यांनी पाकिस्तान तर्फे आत्मसमर्पणाच्या कागद पत्रावर स्वाक्षरी केली होती) यांना विचारले की तुमच्याकडे अजून काही काळ युद्ध करता येईल इतके सैन्य असताना तुम्ही आत्मसमर्पण Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

संकट आयसिसचे – अल कायदा पेक्षा ही मोठे संकट

‘हे म्हणजे जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने मेक्सिको मध्ये घुसखोरी केल्यासारखे आहे’. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००३ मध्ये इराक वर हल्ल्याचा निर्णय घेतला तेव्हा एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने वरील शब्दात याला विरोध केला होता. खरेच बोलला तो. अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकली. कालांतराने सद्दामला पकडून Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

सियालकोट गाथा – लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी

सियालकोट गाथा आहे अरविंद आणि अरबाज या दोन व्यक्तींची ! कलकत्त्यात एका मारवाडी व्यापारी सुखवस्तू कुटुंबातील अरविंद आणि मुंबई मधील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील अरबाज तसे एकमेकांपासून जवळपास २००० किमी अंतरावर आपले जीवन व्यतीत करत होते. पण नियतीने त्यांना वारंवार एकमेकांसमोर उभे केले. इतिहासातील अनेक मुख्य घटनांशी बेमालूमपणे आपले हे कथानक जोडून आश्विन सांघी यांनी Read more

पुस्तके - थोडक्यात परिचय

पेशवाई – मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याला आणखी बळकटी आणली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आणि मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे यांची सुटका केल्यानंतर स्वराज्याचा खरा वारसदार कोण यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू राजे यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचीच परिणती अखेर Read more