प्रस्तावना भारतीय राजकारणामध्ये सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग बर्याच वेळा केला जातो. काही नेत्यांना या प्रयोगाद्वारे अभूतपूर्व यश मिळाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. पण जवळपास ३९२ वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रांमध्ये सोशल इंजिनीयरिंगचे यशस्वी प्रयोग केले होते आणि त्यातूनच पुढे सामान्य रयतेच्या सहभागाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. चुकीच्या रूढी-परंपरांना नष्ट करत विविध सण साजरे करणे, विविध Read more
Tag: history
‘मोसाद’ – भल्याभल्यांनाही पुरून उरणारी मूठभर देशाची चिमूटभर गुप्तहेर संस्था
प्रस्तावना सप्टेंबर १९२९ मध्ये अरबांना आपल्या एकतेची ताकद दाखवून देण्यासाठी ज्यू लोक जेरुसलेम मधील प्राचीन हेरोदच्या दुसऱ्या देवळाच्या भिंतीपाशी जमा झाले. दुपारच्या वेळी त्यांनी त्यांची शेमा नावाची विशिष्ट प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पण काही वेळातच त्यांच्यावर अरबांनी दगडे, फुटक्या बाटल्या आणि दगडे भरलेल्या डब्यांनी जोरदार हल्ला केला. या अनपेक्षित अशा हल्ल्यात कोणीही दगावले नसले तरी Read more
‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ चे गूढ – दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला एक भयानक कट
नवी दिल्ली जवळील नोएडा मधील निर्मनुष्य अशा गोल्फ रोड वर CISF च्या Addl Inspector General (AIG) च्या गाडीचा एका ट्रक सोबत अपघात होतो. हा अपघात नसून घातपात आहे याची जाणीव झालेल्या AIG नी आपल्या त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आपल्या पत्नीला फोन लावला. त्यांनी पत्नीला सांगितले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘ट्यूपॅक II’ ला प्रारंभ केलाय आणि ही गोष्ट Read more
बाजिंद – युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांनी ओतप्रोत कादंबरी
दुर्गदुर्गेश्वर रायगड शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू. मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक. याच गडाच्या टकमक टोकावरून अनेक शत्रूंचा आणि गद्दारांचा कडेलोट केला जायचा. टकमक टोक हे नाव ऐकताच गुन्हेगारांची पाचावर धारण बसायची. टकमक टोकाची दहशतच तशी होती. स्वराज्याच्या शत्रूंना जरब बसवणार्या या टकमक टोकामुळे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडी या गावासाठी मात्र एक संकट निर्माण केले होते. त्यासाठी Read more
हडप्पा संस्कृती चे वर्षानुवर्षे जपलेले एक रहस्य – रक्तधारेचा अभिशाप
राग, लोभ, इर्ष्या, मत्सर हे मानवी स्वभावाचे महत्वाचे पैलू आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात हे गुण असतातच. पण चांगल्या गुणांपेक्षा ज्यावेळी अवगुण हे जास्त प्रभावी होऊ लागतात त्यावेळी कोणताही मनुष्य सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसतो आणि मग त्याचे आणि त्या समाजाचे अध:पतन निश्चित असते. ई.स पूर्व १७००च्या सुमारास त्याकाळी भारतातील (आणि कदाचित जगातील काही Read more
विश्वस्त – श्री कृष्णाच्या खजिन्याची थरारक शोधमोहीम
महाभारत युद्धानंतर तब्बल ३६ वर्षांनंतर कौरवांची माता गांधारीच्या शापाचा परिणाम दिसू लागला. सर्व यादव वंशीय आपापसात लढू लागले आणि परिणामी भगवान श्रीकृष्ण निर्वंश झाले. श्रीकृष्णाची लाडकी नगरी द्वारावती म्हणजे द्वारकेतही अराजक माजले. द्वारकेजवळील समुद्राची लक्षणेही ठीक दिसत नव्हती आणि तो द्वारकेला गिळंकृत करणार हे स्पष्ट दिसू लागले. श्रीकृष्णाचा पृथ्वीतलावरील मानव अवतार संपण्याचे दिवसही जवळ येऊ Read more
Your Prime Minister is Dead – लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्युचे रहस्य
‘जय जवान जय किसान’ ची घोषणा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे आकस्मिक निधन झाले. १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता करार करण्यासाठी ते तत्कालीन सोव्हिएत युनियन मधील ताश्कंद येथे गेले होते. सात दिवस अखंड चाललेल्या वाटाघाटी नंतर अखेर १० जानेवारी रोजी ताश्कंद करारावर भारत आणि Read more
द कृष्णा की – भगवान कृष्णाच्या अमूल्य ठेव्याचे प्राचीन रहस्य
महाभारत खरोखर घडले होते का? की ते एक काल्पनिक महाकाव्य होते? श्री कृष्ण ही काल्पनिक व्यक्तिरेखा होती की प्रत्यक्षात त्याचे अस्तित्व होते? जर श्री कृष्ण प्रत्यक्षात होते तर त्याचे अस्तित्व पौराणिक होते की ऐतिहासिक? लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारा स्यमंतक मणी जादुई होता की त्या मागे काही वैज्ञानिक कारण होते? अण्वस्त्रांचा शोध प्रथम रॉबर्ट ओपेनहायमर ने Read more
चरित्र विश्लेषण – गांधी VS जिन्ना – अंतिम भाग
गांधीजी आणि जिन्ना हे जवळपास ४० वर्षे भारतीय राजकारणात होते. या दरम्यान ते हजारो लोकांच्या संपर्कात आले. याच हजारो लोकांच्या साक्षी आणि आठवणींमधून प्रामुख्याने या दोघांचे जीवन चरित्र उलगडत जाते. गांधीजींचे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी चांगले संबंध असल्याने आज गांधीजींविषयी बरीच माहिती आणि लिखाण उपलब्ध आहे. जिन्ना मात्र थोडे आत्ममग्न स्वभावाचे असल्याने त्यांचे फारसे मित्र Read more
कॅबिनेट मिशन, प्रत्यक्ष कृती दिन आणि भारताची फाळणी – गांधी VS जिन्ना – भाग ०६
दुसर्या महायुद्धामुळे भारतात ब्रिटिशांची दडपशाही वाढली. अन्नधान्याच्या किंमती अवास्तव वाढल्या आणि काही भागात तर दुष्काळ ही पडला. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध जिंकले. पण या विजयानंतर भारताच्या भवितव्याबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले. ब्रिटिश अजून किती काळ भारताला आपल्या ताब्यात ठेवतील आणि ब्रिटिश निघून गेल्यानंतर भारताचे भवितव्य कसे असेल हे स्पष्ट नव्हते. गांधी vs जिन्ना Read more