२२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने डोमेल या भारतीय चौकीवर दगाफटका आणि फंद फितुरीने कब्जा केला. स्वातंत्र्यानंतर ‘ऑपरेशन गुलमर्ग’ या काश्मीर वर कब्जा मिळवण्याच्या आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानने डोमेल पासून केली. आपले राज्य गमावण्याच्या भीतीने महाराजा हरिसिंग ने जम्मू काश्मीर राज्य भारतात विलिनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर भारताचा कायदेशीर आणि अविभाज्य भाग बनला. Read more
Tag: Pakistan
‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ चे गूढ – दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला एक भयानक कट
नवी दिल्ली जवळील नोएडा मधील निर्मनुष्य अशा गोल्फ रोड वर CISF च्या Addl Inspector General (AIG) च्या गाडीचा एका ट्रक सोबत अपघात होतो. हा अपघात नसून घातपात आहे याची जाणीव झालेल्या AIG नी आपल्या त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आपल्या पत्नीला फोन लावला. त्यांनी पत्नीला सांगितले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘ट्यूपॅक II’ ला प्रारंभ केलाय आणि ही गोष्ट Read more
Your Prime Minister is Dead – लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्युचे रहस्य
‘जय जवान जय किसान’ ची घोषणा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे आकस्मिक निधन झाले. १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता करार करण्यासाठी ते तत्कालीन सोव्हिएत युनियन मधील ताश्कंद येथे गेले होते. सात दिवस अखंड चाललेल्या वाटाघाटी नंतर अखेर १० जानेवारी रोजी ताश्कंद करारावर भारत आणि Read more
चरित्र विश्लेषण – गांधी VS जिन्ना – अंतिम भाग
गांधीजी आणि जिन्ना हे जवळपास ४० वर्षे भारतीय राजकारणात होते. या दरम्यान ते हजारो लोकांच्या संपर्कात आले. याच हजारो लोकांच्या साक्षी आणि आठवणींमधून प्रामुख्याने या दोघांचे जीवन चरित्र उलगडत जाते. गांधीजींचे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी चांगले संबंध असल्याने आज गांधीजींविषयी बरीच माहिती आणि लिखाण उपलब्ध आहे. जिन्ना मात्र थोडे आत्ममग्न स्वभावाचे असल्याने त्यांचे फारसे मित्र Read more
कॅबिनेट मिशन, प्रत्यक्ष कृती दिन आणि भारताची फाळणी – गांधी VS जिन्ना – भाग ०६
दुसर्या महायुद्धामुळे भारतात ब्रिटिशांची दडपशाही वाढली. अन्नधान्याच्या किंमती अवास्तव वाढल्या आणि काही भागात तर दुष्काळ ही पडला. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध जिंकले. पण या विजयानंतर भारताच्या भवितव्याबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले. ब्रिटिश अजून किती काळ भारताला आपल्या ताब्यात ठेवतील आणि ब्रिटिश निघून गेल्यानंतर भारताचे भवितव्य कसे असेल हे स्पष्ट नव्हते. गांधी vs जिन्ना Read more
गांधी VS जिन्ना – दांडी यात्रा, सविनय कायदेभंग, पाकिस्तानची संकल्पना- भाग-०४
नवीन दशकाला सुरुवात झाली त्यावेळी जिन्नांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले होते आणि राजकीय आयुष्यात ते एकटे होते. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी चालू असलेले त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरत होते. जिन्ना यांच्या तुलनेत पंजाब, बंगाल इत्यादी ठिकाणचे प्रांतिक मुस्लिम नेते प्रबळ होते आणि त्यांना एकूण मुस्लिम समाजाच्या हितापेक्षा आपल्या प्रांतातील आपला प्रभाव व सत्तेची चिंता जास्त होती. या Read more
गांधी vs जिन्ना – भाग १ – राजकीय जडणघडण
१९व्या शतकात दोन सुशिक्षित वकिलांनी दक्षिण आशियाच्या इतिहास, भूगोल आणि भविष्य सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. एक होते मोहम्मद अली जिन्ना , ज्यांच्या हट्टाहासामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि दुसरे होते मोहनदास करमचंद गांधी, ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक चळवळ चालवली. एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले हे दोघे एकमेकांचे विरोधक कसे बनले? एक धर्मनिरपेक्ष Read more
अफगाणिस्तान – साम्राज्यांचे आणि महासत्तांचे कब्रस्तान?
अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांचे कब्रस्तान’ म्हटले जाते. आजपर्यंत कोणत्याही साम्राज्य अथवा महासत्तेला अफगाणिस्तान मध्ये विजयी होता आलेले नाही. इथे ‘विजयी होणे’ याची व्याख्या प्रत्येक देशाची वेगवेगळी असू शकते. पण ऐतिहासिक सत्य हेच आहे की अफगाणिस्तानमध्ये बडे बडे देश निर्भेळ यश मिळवू शकलेले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटनने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यात यश आले Read more
आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती
दोन व्यक्ती विमानातून धावत आल्या. “ते ओरडत होते, ‘खाली झुका, खाली झुका’” थरथर कापत सुभाष कुमार त्या घटना आठवत होते. अपहरणकर्त्यांच्या या मागणीवर बर्याच प्रवाश्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून अपहरणकर्त्यांनी अशा सर्व प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच विमानावर अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवला. आयसी८१४ या इंडियन एयरलाइन्सच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य Read more
‘𝐀 𝐂𝐚𝐥𝐥 𝐭𝐨 𝐇𝐨𝐧𝐨𝐮𝐫’- उगवत्या भारताच्या जयजयकाराची वेळ?
१९९८ ते २००४ पर्यंत केंद्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते आणि पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी. वाजपेयींनी तर या काळात तब्बल तीनवेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. रालोआ सरकारची ही जवळपास सहा वर्षे भारताच्या आणि जगाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी भरलेली आहेत. या घडामोडी अशा होत्या की ज्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक प्रस्थापित समजूती मोडीत Read more