ही कहाणी आहे महाभारतातील एका रहस्यमय अशा शस्त्राची ज्याला कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या मगधाच्या राजाने पांडवांविरुद्ध वापरण्यासाठी बनवले होते. पण हे शस्त्र वापरण्याची वेळच आली नाही. हे रहस्य इतके स्फोटक होते की सम्राट अशोकानेही हे रहस्यमय शस्त्र कधीच जगासमोर येऊ नये याचा काटेकोर बंदोबस्त केला. पण आता वर्तमानकाळात एक पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबा Read more
Tag: India
भगतसिंगचा खटला – न्यायाच्या हत्येचे कारस्थान
“जर जर्मनीने अथवा रशियाने इंग्लंडवर आक्रमण केले, तर त्या आक्रमकांना हिंसक प्रतिकार करू नका,’ असा उपदेश लॉर्ड आयर्विन (इंग्लंडच्या) जनतेला करणार आहेत का? जर तसे ते करणार नसतील, तर या खटल्याबद्दलही त्यांनी काही उठाठेव करू नये. पण एक गोष्ट मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो – भगतसिंगची विचारसरणी मला पटो वा न पटो, त्याच्यासारख्या माणसाचे अविचल धैर्य Read more
२४ अकबर रोड – कॉंग्रेसचा स्वातंत्र्यापासूनचा प्रवास
जानेवारी १९७८ ला काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष के ब्रम्हानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींची काँग्रेस मधून हकालपट्टी केली. काँग्रेस पक्षात फूट पडली आणि याचा मोठा तोटा इंदिरा गांधींना झाला. दोन गटांच्या भांडणात निवडणूक आयोगाने काँग्रेसचे तोपर्यंतचे निवडणूक चिन्ह गाय वासरू कायमचे गोठवले आणि बुटासिंग यांना इंदिरा काँग्रेस साठी नव्या चिन्हासाठी हत्ती, सायकल आणि हाताचा पंजा असे तीन Read more
डोमेल ते कारगिल – काश्मीरच्या परिस्थितीचे सखोल विश्लेषण
२२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने डोमेल या भारतीय चौकीवर दगाफटका आणि फंद फितुरीने कब्जा केला. स्वातंत्र्यानंतर ‘ऑपरेशन गुलमर्ग’ या काश्मीर वर कब्जा मिळवण्याच्या आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानने डोमेल पासून केली. आपले राज्य गमावण्याच्या भीतीने महाराजा हरिसिंग ने जम्मू काश्मीर राज्य भारतात विलिनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर भारताचा कायदेशीर आणि अविभाज्य भाग बनला. Read more
माओ-त्से-तुंग – चीनी साम्यवादी क्रांतीचे रोमहर्षक चित्र आणि चरित्र
१९९०-९१ मध्ये सोविएत रशिया कोसळल्यानंतर जगभरामध्ये साम्यवादाचा फोलपणा सर्वांच्या समोर आला. मूळात याची सुरुवात १९५६ मध्येच झाली होती ज्यावेळी सोविएत रशियाचा तत्कालीन अध्यक्ष निकिता कृश्चेवने साम्यवादी पक्षाच्या २०व्या अधिवेशनात स्टॅलिनच्या अमानुष कृत्यांचा पाढा जाहीरपणे वाचला. जवळपास तब्बल २५ वर्षे जागतिक साम्यवादी चळवळीचे नेतृत्व केलेल्या स्टॅलिनच्या विरोधातील कृश्चेवचे हे भाषण साम्यवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. सोविएत Read more
‘ऑपरेशन ट्यूपॅक II’ चे गूढ – दहशतवाद्यांनी भारताविरोधात रचलेला एक भयानक कट
नवी दिल्ली जवळील नोएडा मधील निर्मनुष्य अशा गोल्फ रोड वर CISF च्या Addl Inspector General (AIG) च्या गाडीचा एका ट्रक सोबत अपघात होतो. हा अपघात नसून घातपात आहे याची जाणीव झालेल्या AIG नी आपल्या त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आपल्या पत्नीला फोन लावला. त्यांनी पत्नीला सांगितले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ‘ट्यूपॅक II’ ला प्रारंभ केलाय आणि ही गोष्ट Read more
हडप्पा संस्कृती चे वर्षानुवर्षे जपलेले एक रहस्य – रक्तधारेचा अभिशाप
राग, लोभ, इर्ष्या, मत्सर हे मानवी स्वभावाचे महत्वाचे पैलू आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात हे गुण असतातच. पण चांगल्या गुणांपेक्षा ज्यावेळी अवगुण हे जास्त प्रभावी होऊ लागतात त्यावेळी कोणताही मनुष्य सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसतो आणि मग त्याचे आणि त्या समाजाचे अध:पतन निश्चित असते. ई.स पूर्व १७००च्या सुमारास त्याकाळी भारतातील (आणि कदाचित जगातील काही Read more
Your Prime Minister is Dead – लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्युचे रहस्य
‘जय जवान जय किसान’ ची घोषणा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे आकस्मिक निधन झाले. १९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता करार करण्यासाठी ते तत्कालीन सोव्हिएत युनियन मधील ताश्कंद येथे गेले होते. सात दिवस अखंड चाललेल्या वाटाघाटी नंतर अखेर १० जानेवारी रोजी ताश्कंद करारावर भारत आणि Read more
स्पाय प्रिन्सेस – जॉर्ज क्रॉस विजेती भारताची महिला गुप्तहेर
ती माताहारी सारखी फार मोठी गुप्तहेर नव्हती पण तीने दुसर्या महायुद्धात जे काही हेरगिरीचे कार्य पार पाडले तेसुद्धा उल्लेखनीय होते. तिच्या या कामगिरीने दुसर्या महायुद्धात ब्रिटिशांना जर्मनी विरूद्ध बहुमोल माहिती मिळत गेली. तिच्या या कामगिरीबद्दल तिला जॉर्ज क्रॉस हा ब्रिटिश सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला. गंमत म्हणजे तिचे वडील भारतीय होते आणि आई अमेरिकन Read more
१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट
१९६२ची नामुष्की – एक न सांगण्याजोगी गोष्ट! एखाद्या देशासाठी, समाजासाठी काही गोष्टी नामुष्कीजनक असतात. पण त्याच देशाच्या भावी पिढीच्या वाट्याला तशीच नामुष्की पुन्हा येऊ नये म्हणून या न सांगण्याजोग्या गोष्टी सुद्धा नाईलाजाने सांगाव्या लागतात. १९६२ मध्ये चीन विरुद्धच्या लढाईत भारताचा झालेला दारुण पराभव ही एक अशीच न सांगण्याजोगी गोष्ट! ही पराभवाची शोकांतिका पुन्हा आपल्या वाट्याला Read more