१८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान मधील सायगाव येथे झालेल्या कथित विमान अपघातात झालेला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू हे आजपर्यंतचे भारतातील कदाचित सर्वात मोठे रहस्य असावे. १९४५ मध्ये नेमके काय झाले? या रहस्याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत भारत सरकारने तीन वेगवेगळ्या समित्या स्थापूनही हे रहस्य अजूनही उलगडता आलेले नाही. नेताजींच्या या रहस्याबाबत सत्य शोधून काढण्याची Read more
Tag: India
चरित्र विश्लेषण – गांधी VS जिन्ना – अंतिम भाग
गांधीजी आणि जिन्ना हे जवळपास ४० वर्षे भारतीय राजकारणात होते. या दरम्यान ते हजारो लोकांच्या संपर्कात आले. याच हजारो लोकांच्या साक्षी आणि आठवणींमधून प्रामुख्याने या दोघांचे जीवन चरित्र उलगडत जाते. गांधीजींचे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी चांगले संबंध असल्याने आज गांधीजींविषयी बरीच माहिती आणि लिखाण उपलब्ध आहे. जिन्ना मात्र थोडे आत्ममग्न स्वभावाचे असल्याने त्यांचे फारसे मित्र Read more
कॅबिनेट मिशन, प्रत्यक्ष कृती दिन आणि भारताची फाळणी – गांधी VS जिन्ना – भाग ०६
दुसर्या महायुद्धामुळे भारतात ब्रिटिशांची दडपशाही वाढली. अन्नधान्याच्या किंमती अवास्तव वाढल्या आणि काही भागात तर दुष्काळ ही पडला. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध जिंकले. पण या विजयानंतर भारताच्या भवितव्याबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले. ब्रिटिश अजून किती काळ भारताला आपल्या ताब्यात ठेवतील आणि ब्रिटिश निघून गेल्यानंतर भारताचे भवितव्य कसे असेल हे स्पष्ट नव्हते. गांधी vs जिन्ना Read more
दुसरे महायुद्ध, क्रिप्स मिशन – गांधी VS जिन्ना – भाग – ०५
१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिश सरकारने हे युद्ध जिंकण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. ब्रिटिशांनी कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या त्यांच्या विरोधकांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या युद्ध काळात सनदशीर मार्गाने स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे हे कॉंग्रेसला माहित होते. म्हणून कॉंग्रेस ने आक्रमक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला. त्यानूसार Read more
गांधी VS जिन्ना – दांडी यात्रा, सविनय कायदेभंग, पाकिस्तानची संकल्पना- भाग-०४
नवीन दशकाला सुरुवात झाली त्यावेळी जिन्नांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले होते आणि राजकीय आयुष्यात ते एकटे होते. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी चालू असलेले त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरत होते. जिन्ना यांच्या तुलनेत पंजाब, बंगाल इत्यादी ठिकाणचे प्रांतिक मुस्लिम नेते प्रबळ होते आणि त्यांना एकूण मुस्लिम समाजाच्या हितापेक्षा आपल्या प्रांतातील आपला प्रभाव व सत्तेची चिंता जास्त होती. या Read more
गांधी VS जिन्ना – भाग ०३ – असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ इत्यादी
गांधी VS जिन्ना याच्या आजच्या भाग ०३ मध्ये वाचा असहकार आंदोलन, खिलाफत चळवळ इत्यादी अनेक घडामोडींमध्ये या दोघांच्या भूमिका. १९१९ मध्ये गांधी आणि जिन्ना यांच्यात कॉंग्रेसचे नेतृत्व आणि संघटनेचे स्वरूप या बाबींवर सुप्त संघर्ष सुरू झाला होता. त्याकाळी मुस्लिम लीग चे नेते प्रामुख्याने प्रादेशिक पातळीवरील राजकारणात उत्सुक होते. त्यामुळे कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर मुस्लिम लीग शिवाय Read more
गांधी VS जिन्ना – भाग – ०२ – भारतीय राजकारणातील आगमन
१९००व्या शतकाच्या सुरूवातीला भारतातील ब्रिटिश सत्तेत व्हाईसरॉय हे सर्वोच्च होते. त्यांच्या हाताखाली विविध राज्य आणि स्थानिक पातळीवरील कायदेमंडळाद्वारे सत्ता राबवली जायची. केवळ स्थानिक पातळीवर होणार्या थोड्याफार निवडणुका वगळल्या तर या सर्व व्यवस्थेमध्ये उच्च पातळीवर लोकांचे प्रतिनिधित्व करणारे कोणीही नव्हते. ब्रिटिशांच्या या व्यवस्थेबाहेर असलेल्या भागांमध्ये संस्थानिक आणि राजे-महाराजांचे राज्य होते. हे राजे-महाराजे आपापल्या संस्थानाचे व्यवहार पाहण्यास Read more
गांधी vs जिन्ना – भाग १ – राजकीय जडणघडण
१९व्या शतकात दोन सुशिक्षित वकिलांनी दक्षिण आशियाच्या इतिहास, भूगोल आणि भविष्य सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. एक होते मोहम्मद अली जिन्ना , ज्यांच्या हट्टाहासामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि दुसरे होते मोहनदास करमचंद गांधी, ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक चळवळ चालवली. एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले हे दोघे एकमेकांचे विरोधक कसे बनले? एक धर्मनिरपेक्ष Read more
अफगाणिस्तान – साम्राज्यांचे आणि महासत्तांचे कब्रस्तान?
अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांचे कब्रस्तान’ म्हटले जाते. आजपर्यंत कोणत्याही साम्राज्य अथवा महासत्तेला अफगाणिस्तान मध्ये विजयी होता आलेले नाही. इथे ‘विजयी होणे’ याची व्याख्या प्रत्येक देशाची वेगवेगळी असू शकते. पण ऐतिहासिक सत्य हेच आहे की अफगाणिस्तानमध्ये बडे बडे देश निर्भेळ यश मिळवू शकलेले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटनने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यात यश आले Read more
आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती
दोन व्यक्ती विमानातून धावत आल्या. “ते ओरडत होते, ‘खाली झुका, खाली झुका’” थरथर कापत सुभाष कुमार त्या घटना आठवत होते. अपहरणकर्त्यांच्या या मागणीवर बर्याच प्रवाश्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून अपहरणकर्त्यांनी अशा सर्व प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच विमानावर अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवला. आयसी८१४ या इंडियन एयरलाइन्सच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य Read more