Author: gajananharalikar

अनुवादित

गांधी vs जिन्ना – भाग १ – राजकीय जडणघडण

१९व्या शतकात दोन सुशिक्षित वकिलांनी दक्षिण आशियाच्या इतिहास, भूगोल आणि भविष्य सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. एक होते मोहम्मद अली जिन्ना , ज्यांच्या हट्टाहासामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि दुसरे होते मोहनदास करमचंद गांधी, ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक चळवळ चालवली. एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले हे दोघे एकमेकांचे विरोधक कसे बनले? एक धर्मनिरपेक्ष Read more

अनुवादित

अफगाणिस्तान – साम्राज्यांचे आणि महासत्तांचे कब्रस्तान?

अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांचे कब्रस्तान’ म्हटले जाते. आजपर्यंत कोणत्याही साम्राज्य अथवा महासत्तेला अफगाणिस्तान मध्ये विजयी होता आलेले नाही. इथे ‘विजयी होणे’ याची व्याख्या प्रत्येक देशाची वेगवेगळी असू शकते. पण ऐतिहासिक सत्य हेच आहे की अफगाणिस्तानमध्ये बडे बडे देश निर्भेळ यश मिळवू शकलेले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटनने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यात यश आले Read more

मराठी पुस्तके

प्रतिपश्चंद्र – विजयनगरच्या खजिन्याची रोमांचक शोधकथा

ई.स १३३६ मध्ये वज्रासारख मन आणि पोलादी मनगट असलेल्या हरीहरराय आणि बुक्कराय या दोन भावांनी गोदावरी पासून ते कावेरी पर्यंत एक साम्राज्य उभे केले. तेच ते ‘विजयनगर साम्राज्य‘! हे साम्राज्य सामर्थ्यशाली आणि संपन्न तर होतेच पण स्थापत्य व शिल्पकलेमध्ये सुद्धा प्रगत होते. पण कालांतराने या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्यावेळी विजयनगर साम्राज्याची अफाट संपत्ती Read more

अनुवादित

आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती

दोन व्यक्ती विमानातून धावत आल्या. “ते ओरडत होते, ‘खाली झुका, खाली झुका’” थरथर कापत सुभाष कुमार त्या घटना आठवत होते. अपहरणकर्त्यांच्या या मागणीवर बर्‍याच प्रवाश्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून अपहरणकर्त्यांनी अशा सर्व प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच विमानावर अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवला. आयसी८१४ या इंडियन एयरलाइन्सच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य Read more

अनुवादित

हिमालयन ब्लंडर – चीन विरूद्धच्या पराभवाची 6 मुख्य कारणे

प्रस्तावना कोणत्याही नवस्वतंत्र देशासमोर आपले प्राधान्यक्रम ठरवण्याचे फार मोठे आव्हान असते. तो देश जर भारतासारखा अविकसित आणि विविधतेने भरलेला असेल तर हे आव्हान अधिकच गुंतागुंतीचे बनून जाते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हाच प्रश्न होता. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सशस्त्र दले आणि निमलष्करी दलांना मजबूत करणे अथवा Read more

अनुवादित

‘𝐀 𝐂𝐚𝐥𝐥 𝐭𝐨 𝐇𝐨𝐧𝐨𝐮𝐫’- उगवत्या भारताच्या जयजयकाराची वेळ?

१९९८ ते २००४ पर्यंत केंद्रामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते आणि पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी. वाजपेयींनी तर या काळात तब्बल तीनवेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. रालोआ सरकारची ही जवळपास सहा वर्षे भारताच्या आणि जगाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी भरलेली आहेत. या घडामोडी अशा होत्या की ज्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक प्रस्थापित समजूती मोडीत Read more

अनुवादित

आयएसआय आणि रॉ ने संयुक्तपणे लिहिलेले पुस्तक

प्रस्तावना ‘आम्ही दोघांनी मिळून काल्पनिक गोष्टी जरी लिहिल्या, तर त्यावर सुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही.” ‘The Spy Chronicles: RAW, ISI and the Illusion of Peace’ हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना समोर आली तेव्हा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय चे माजी प्रमुख जन. असद दुर्राणी यांनी वरील प्रतिक्रिया दिली. खरेच आयएसआय आणि भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’ यांचे माजी Read more

अनुवादित

‘ओडेसा फाइल’-जर्मन नाझी अधिकार्‍याची थरारक शोधकथा

स्वत:ला देशभक्त म्हणवणार्‍या व्यक्ती वा संघटनांना आपल्या देशभक्तीचे पुरावे देण्यासाठी कोणतेही अमानुष कृत्ये करण्याची गरज नसते. असे लोक व संघटना संकटाच्या समयी आपल्या देशवासीयांना एकाकी सोडून पळून जात नाहीत. परंतू हाच प्रकार जर्मनी मध्ये दुसर्‍या महायुद्धानंतर घडला आणि ज्यूं वर अनन्वित अत्याचार करणारे नाझी हे कृत्य देशासाठी केल्याचे लंगडे समर्थन करत लपून छपून आपली कारवाई Read more

अनुवादित

भारत चीन युद्धातील भारतीय हवाईदलाचे योगदान

भारताचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी एकदा एका मुलाखतीमधे चीनला भारताचा क्रमांक एकाचा शत्रू म्हटले होते. १५ जूनला लडाखच्या गलवान खोर्‍यात झालेल्या चकमकीनंतर याचा सहजपणे प्रत्यय येत आहे. या चकमकीनंतर भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपले सैन्य वाढवले. भारतीय हवाईदलाने सुद्धा जास्त संख्येने आपली विमाने लेह मध्ये तैनात केली. आता तर फ्रान्स मधून नव्याने आलेल्या राफेल Read more

अनुवादित

पहिले काश्मीर युद्ध आणि भारतीय हवाईदल

प्रस्तावना ०५ ऑगस्ट २०१९, जम्मू-कश्मीर च्या इतिहासातील एक महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस! तसा या राज्याच्या इतिहासात असे अनेक महत्वाचे दिवस खच्चून भरले आहेत, पण या दिवसाचे महत्व खचितच वेगळे. जम्मू-काश्मीरला वेगळी ओळख देणारे भारतीय संविधांनातील कलम ३७० भारत सरकारने हटवले आणि खर्‍या अर्थाने जम्मू-कश्मीरचे भारतात एकीकरण झाले. हे कलम ३७० आहे काय?काश्मीर समस्या काय आहे? Read more